Sunday, 18 September 2011
हैद्राबादच्या निजामाचे कपट आणि सरदार पटेलांचे द्रष्टेपण --मराठवाडा मुक्तीसंग्रमाची कथा
.-येथील ज्या काही हे(मुक्ती-संग्राम) लोकांना माहित नसेल तर त्यांना , नक्कीच इतिहासातील अप्रचलित बाबी कळल्या असतील.नवीन पिढीला ,शाळेत शिकलेला जुजबी इतिहासच बहुतेकदा पूर्णपणे आठवतो का नाही कोणजाणे .सावरकर,नेताजी ,सरदार वल्लभ भाई पटेल हे नेते तर झाकोळले गेले आहेत. मुलांनो,खूप वाचा.अधाशीपणाने उत्तमोत्तम वाचा. खरा ,इतिहास नव्याने,नीरक्षीर विवेकाने जाणा .मोगलाई काय भयानक होती ते पूर्णांशाने अनुभवलेले , फार थोडे लोक आता या जगात उरले असतील. विदर्भ -मराठवाड्यातील अनेक जुन्या वाड्यातील ,लादनी हा तळघराचा वस्तुविशेष बघावा.मोगल निजामी अत्याचाराकांच्या झुंडी आल्या कि बायका -पोरे ह्या लादन्यांमध्ये लपवून ठेवून पुरुष माणसे रक्षणास सज्ज होत. अत्यंत अन्यायी व्यवस्थेस आजही "काय ,मोगलाई/निजामशाही लागून राहिली/गेली का "असे म्हणतात,१९४७ नंतर ,पाकशी संधान बांधून व त्याच्या अटीनुसार करोडो रुपये दिवाणामार्फात परदेशी बँकेत पाकला देण्याच्या नजराण्याच्या रुपात कदाचित आजही सापडतील. भारताच्या केंद्रस्थानी,अगदी पोटात एक नवे पाकीस्थान निर्माण होत होते. जुनागढ हे मुस्लीम बहुल संस्थान , इतर संस्थानान्सोबत कसे बसे पटेलांनी ,स्वराज्यात सामील कून घेतले .पण, हैदराबादच्या निजामाची कपटी चाल ओळखून पटेलांनी अचानक झटपट हालचाली करून ते खालसा केले म्हणून बरे. अन्यथा इतिहास अधिक कटू बनला असता.