**आता कसे वागावे ...प्रेमाने की ताठ्याने ?
"या जगात भान्डूनच सारे मिळवावे लागते.. रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग...असेच हल्ली वाटायला लागलेय. "....ही आणि अशी वक्तव्ये आजकाल खूपवेळा कानावर येतात. स्थिती बदलली आहे हे खरे.पण माझा माणुसकीवर अद्याप विश्वास आहे. भान्डूनच प्रत्येक गोष्ट मिळते ? नाही ,१०० % हेही बरोबर म्हणता येत नाही. अद्याप माणुसकी,प्रेम शिल्लक आहे या जगात. प्रेमाने काही गोष्टी मिळतात. कधी कधी खरेच भांडण्यापेक्षा,शत्रुत्व ...नि...र्माण करण्यापेक्षा गोड बोलून,समजून-समजावून कठीण बाबी साध्य होतात.प्रेम हीच पहिली पायरी. अनेकवार प्रयत्न करोनही न जमल्यास मग च अन्य पर्यायांचा विचार करावा.असे मला वाटते.मी तेच आधी म्हटले आहे.आईचे प्रेम,कुटुंबातील स्नेह बंध, मित्र-प्रेम ,गुरूंनी दिलेले ज्ञान(मारकुट्या गुरुजींचे शिकवणे १०० ५दोक्यत शिरते का?नाही ना? प्रेमाने ,हसत-खेळत शिकवणारे गुरु कायम स्मरणात राहतात. नि ते ज्ञान ही.),कधी लोकल मध्ये खिडकीजवळची जागा,कधी रांगेत दूर असूनही प्रेमाने विनंती केल्यास झटकन समोरच्याने आपलेही तिकीट काढून देणे,शेजारुअने अनपेक्षितपणे मदत करणे....हजारो गोष्टी... करा.अनुभव..आठवा...
हे तत्व जुनेच आहे.हिंदूंची ही जीवन-प्रणाली आहे.मरणाचा त्रास देनारान्नाही "जे खळांची व्यंकटी सांडो"असे देवाकडे साकडे घालणारे नि समस्त विश्वाचे भले चिंतणारे संत ज्ञानेश्वर याच मराठी मातीतले न?मात्र आज सुरुवातीस मावोपणे,प्रेमानेच आपलेसे करण्याचा प्रयत्न करावा.,नंतर ते न जमल्यास मात्र संत तुकोबारायांचे वाचन आठवावे लागेल. भले तरी देवू कासेची लंगोटी| नाठाळाचे माथी हाणू काठी||
नाहीतरी प्राचीन सुभाषितकार सांगून गेलेच आहेत ना १-साम-२-दाम-३-दंड (वाद,शिक्षा,)४-
भेद....