Tuesday, 11 October 2011

धरती के लाल -लाल बहादूर यांची थोरवी.

                 
असा नेता ,जाणता ! की प्रेमात बुडाली जनता....स्वातंत्र्य संग्रामातील प्रमुख स्वातंत्र्य सेनानी, भारताचे तिसरे माजी पंतप्रधान.'जय जवान ,जय किसान' या प्रेरक घोषणे करिता प्रसिद्ध. यांच्या कार्यकालात १९६५ चे भारत आणि पाकिस्तान युद्ध झाले.आणि मस्तवाल पाकचे कम्बरडे मोडले.उनोच्या सूचनेने युद्धबंदी झाली.आणि ताश्कंद येथे जड मनाने , तहावर स्वाक्षरी करावी लागली. त्याच रात्री अनपेक्षितपणे तेथेच त्यांचा झटक्याने मृत्यू झाला.सारा देश दु:खात बुडाला.जनस!मान्यांचा मनमिळाऊ,लोकप्रिय सत्शील नेता गेला. नेता असावा तर असा.असा थोर नेता पुन्हा या देशाच्या दीर्घकाळ सत्तेत राहिलेल्या पक्षात अन्य झाला नाही, होणे नाही.
जेमतेम वर्षभरच पंतप्रधानपदवर राहिलेले पण देशाच्याच नव्हे, तर जगाच्या इतिहासात अजरामर झालेले पंतप्रधान म्हणूनच लालबहादूर शास्त्री यांची साऱ्यांना आठवण राहील.अशी आहे या धरती के लाल -लाल बहादूर यांची थोरवी.