आपले ज्ञान लिखित रुपात उपलब्ध नसूनही पिढ्यान पिढ्या जतन केले गेले ,तेही किती अचूक रित्या ! हे मोठे महत्त्वाचे नि सुनियोजित महत्कार्य ब्राह्मणांनी केले.पाठक,वेदपाठक, पुरोहित.आचार्य ,वेदाचार्य , द्विवेदी,त्रिवेदी चतुर्वेदी ह्या लोकांनी सहस्त्र, दश /शत सहस्त्रके =हजारो वर्षे हा ठेवा मुखोद्गत ज्ञान संचित म्हणून आपणास आज उपलब्ध करून दिला आहे.त्यांच्या या अतुलनीय कार्य बद्दल आपण ऋणी असले पाहिजे ...इंग्रजांनी आधुनिक शिक्षणाचा पाया, लॉर्ड मेकाले च्या धूर्त सल्ल्याने येथे घालून ,अस्मिता,-संस्कृतीवर पहिला घाव घातला. आपले ते सारे खोटे,मित्थ्या असे जनता मानू लागली.पुरावे देण्या एवढे चिकित्सक,सखोल ज्ञान बहुतेकांना नव्हते,असेल त्यांना जमले नाही .नि आपण न्यूनगंडाने ग्रस्त झालो. असो. आता इंग्रजीमुळे आपण जागतिक स्तरावर अधिराज्य करू शकतो(त्यामुळे मेकाले ही एक इष्टापत्ती मानू या.) तसे अग्रेसर राहू या .आणि अशा जन-जागृतीमुळे पुनश्च आपली आद्य संस्कृती जाणून तिचा अभिमान नक्कीच बाळगू या.
आपले सारे वेद,पुराणे,रामायण ,महाभारत,कितीतरी सुंदर नाटके,कथा-कादंबऱ्या,वैद्यकीय ज्ञान संस्कृतमध्ये आहे.(सुश्रुताने नाकाच्या शल्यक्रीयेची -प्लास्टिक सर्जरीची जी पद्धत हजारो वर्षांपूर्वी शोधली ,जवळजवळ तीच, तशीच आज पाश्चात्य सर्जनही वापरतात ....चरकाने ज्या औषधी वनस्पती,वस्तूंचे वर्णन ,गुणधर्म ,उपयोग सांगितले ते आज हि शाश्वत आहेत.आयुर्वेदाची अपायरहित गुणकारकता जाणून परदेशात लोकप्रियता वाढते आहे.आपण करंटे ते जणू तो सुदिन ) हे ज्ञान खरे तर उर्वरित ,कालौघात शिल्लक राहिले तेवढे ,काहीसे कमीच आहे.नि आहे ते सारेच किती बहुमूल्य आहे हे कळायला फार मोठ्या विद्वत्तेची गरज नाही.हवा फक्त थोडा भारताचा- आपल्या देशाचा ,संस्कृतीचा अभिमान. संस्कृत पुस्तकांना आग लावा-जाळून टाका म्हणणे म्हणजे आपल्या अज्ञानाचे,करण्तेपानाचे लक्षण आहे असेच म्हणावे लागेल.आज अमेरिकेच्या संसदेत (हाउस)वेदघोष होतो.इंग्लंडमध्ये अनेक शाळांतील मुले आवडीने संस्कृत शिकत आहेत. ते का?इथल्या ज्ञानाचे महत्त्व त्यांना पटले आहे.तिकडून येऊन ते आपल्याला सांगतील तेंव्हाच कळणार का आपल्याला ही महती ?
जयतु हिंदू-राष्ट्रम.
आपले सारे वेद,पुराणे,रामायण ,महाभारत,कितीतरी सुंदर नाटके,कथा-कादंबऱ्या,वैद्यकीय ज्ञान संस्कृतमध्ये आहे.(सुश्रुताने नाकाच्या शल्यक्रीयेची -प्लास्टिक सर्जरीची जी पद्धत हजारो वर्षांपूर्वी शोधली ,जवळजवळ तीच, तशीच आज पाश्चात्य सर्जनही वापरतात ....चरकाने ज्या औषधी वनस्पती,वस्तूंचे वर्णन ,गुणधर्म ,उपयोग सांगितले ते आज हि शाश्वत आहेत.आयुर्वेदाची अपायरहित गुणकारकता जाणून परदेशात लोकप्रियता वाढते आहे.आपण करंटे ते जणू तो सुदिन ) हे ज्ञान खरे तर उर्वरित ,कालौघात शिल्लक राहिले तेवढे ,काहीसे कमीच आहे.नि आहे ते सारेच किती बहुमूल्य आहे हे कळायला फार मोठ्या विद्वत्तेची गरज नाही.हवा फक्त थोडा भारताचा- आपल्या देशाचा ,संस्कृतीचा अभिमान. संस्कृत पुस्तकांना आग लावा-जाळून टाका म्हणणे म्हणजे आपल्या अज्ञानाचे,करण्तेपानाचे लक्षण आहे असेच म्हणावे लागेल.आज अमेरिकेच्या संसदेत (हाउस)वेदघोष होतो.इंग्लंडमध्ये अनेक शाळांतील मुले आवडीने संस्कृत शिकत आहेत. ते का?इथल्या ज्ञानाचे महत्त्व त्यांना पटले आहे.तिकडून येऊन ते आपल्याला सांगतील तेंव्हाच कळणार का आपल्याला ही महती ?
जयतु हिंदू-राष्ट्रम.